श्री शिवराजाभिषेक [ Coronation ceremony of Shivaji Maharaj ]
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh3UxUGQFwt5_mtPpieRP9vO5Y0OX1RD-U9k4JkC3J1U2Q1_zcsN60Gw6EZ24MLvUaRZVSygb8PVfL54udnk_pbwHzJ2w5kt1ymTpeJG6ZU70j_8rIo4kf7jQXZZ-Ih1SaRDAY7AUv9Qph5SyNu8uug7jnhdch-4ZZ6cCiY-_xMWM-xlaaqIX69xkSfxVI/w400-h268/439966743_8109717949056071_7361618509169460031_n.jpg)
मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अनेक अपूर्व अश्या घटना , प्रसंग घडले आहेत . त्यातील अत्यंत महत्वाची आणि कालातीत घटना म्हणजे , श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हि होय . वास्तवात एखाद्या राजाचा राज्याभिषेक होणे हा प्रसंग जरी तत्कालीन समाज पद्धतीनुसार सामान्य असला तरी , छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही घटना किंवा प्रसंग हा असामान्य होती असेच आम्हांस वाटते . एखादी घटना जेंव्हा असामान्य म्हणून गणली जाते , तेंव्हा त्या घटनेचे पूर्वरंग आणि परिणाम हे दूरगामी असतात . श्री शिवराज्याभिषेकाचे देखील तसेच आहे . शिवाजी महाराजांचे राज्य हे काही वंश परंपरेने चालत आलेले किंवा वारसा हक्काने प्राप्त झालेले राज्य नव्हते . शिवाजी महाराजांचे राज्य , स्व - धर्म , स्व - संस्कृती , स्व - भाषा यांचा स्वाभिमान तथा अवलंब असणारे स्व - राज्य होते . शिवरायांच्या जन्मापूर्वीची भारतीयांची परिस्थिती अत्यंत दयनीय तसेच परकीय आक्रमक आणि राज्यकर्ते यांच्या अत्याचाराखाली भरडली ज