Posts

Showing posts from February, 2022

कल्पतरू : ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

Image
  छायाचित्र सौजन्य     ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर येते नामस्मरण! आजच्या युगात नामस्मरणात किती प्रचंड सामर्थ्य आहे हे अतिशय साध्या, सोप्या शब्दात रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन गोंदवलेकर महाराजांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही वेळी, स्थळी, सोवळे ओवळे न पाळता अतिशय सहजपणे पण तळमळीने घेतलेले नाम आपल्याला खूप समाधान देते आणि रामापर्यंत पोचण्याचे सहज, सोपे साधन आहे असे महाराज आपल्याला कळकळीने सांगतात. महाराजांनी सांगितलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान! पोटभर जेवल्यावर जि तृप्तता मिळते ती इतर कोणत्याही वस्तू कितीही प्रमाणात मिळाल्या तरी नसते. आजही गोंदवल्यात हे अन्नदान अव्याहतपणे चालू आहे. नामस्मरण करणाऱ्या माणसाच्या पाठीशी महाराज कायमच असतात याचे कितीतरी अनुभव अनेक लोकांना येत असतात. म्हणूनच जो एकदा गोंदवल्याला येतो तो कायमचा इथलाच होऊन जातो. मी सुद्धा महाराजांवर श्रद्धा असणारी अतिशय लहान व्यक्ती आहे. खरं तर महाराजांवर काही लिहिण्याइतकी मी काही मोठी नाही किंवा माझी एवढी साधनाही नाही.  पण माझी श्रद्धा आहे महाराजांवर आणि प्रत्येक प्रसंगात ते माझ्या पा

रोकडी प्रचिती देणारा ग्रंथराज : श्री दासबोध

Image
  ।। श्रीराम समर्थ ।। आज माघ शु . नवमी अर्थात दासबोध जयंती . त्यानिमित्ताने दासबोध बाबत लेखन सुरु करत आहे . " ग्रंथराज दासबोध " म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांचे ज्ञान , तत्वज्ञान , साहित्य मूल्य यांचा परमोच्च बिंदू आहे असेच मला वाटते . वास्तवात दासबोध या ग्रंथावर लिहिण्यासाठी मी कोणी अभ्यासक , चिंतक किंवा अधिकारी व्यक्ती नाही परंतु दासबोधाचे सहज वाचन करत असताना सुचलेले मनोगत मांडावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच . मेथवडेकर - रामदासी या दासबोधी कुळात जन्म झाल्याने , अगदी नकळत दासबोधातील किंवा अन्य समर्थ साहित्यातील वचने कानावर पडतच होती . घरातील थोर-मोठी मंडळी विशेषतः माझ्या आईची - आई ( आज्जी ) नेहमी सांगत असे की ; आयुष्यात एकदा तरी दासबोध वाचलाच पाहिजे , समजून घेतलाच पाहिजे . तिचे म्हणणे असे की ; “ दासबोध हा प्रचिती करता वाचला पाहिजे , दासबोध वाचन हे केवळ पुण्यप्राप्ती करता नसून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी असते . ” तेंव्हा यातलं फारसं कळलं नाही पण जे