Posts

Showing posts from February, 2019

स्वा.सावरकरांकडून काय शिकावे ?

Image
  सावरकरांकडून काय शिकावे ? © श्रीपाद श्रीकांत रामदासी आज २६ फेब्रुवारी अर्थात स्वा. सावरकरांचा आत्मार्पण दिन, सर्वप्रथम स्वा. सावरकरांना विनम्र अभिवादन !!! स्वा.सावरकरांच्या विचारातून , चरित्रातून आजच्या पिढीने नेमके काय घ्यावे ? " जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी " या उक्तीस आदर्श मानून प्रत्यक्षात स्वर्ग जरी मिळत असेल तरी त्याचे मूल्य , आपल्या मातृभूमीपेक्षा , राष्ट्रभूमीपेक्षा कमीच समजावे. आपले राष्ट्र आपली मायभूमी हेच आपले सर्वस्व मानून तिच्यासाठी प्रसंगी , प्राणत्याग करण्याची तयारी देखील असावी. " राखावी बहुतांची अंतरे " या उक्तीप्रमाणे जास्तीत जास्त जन संपर्क करावा. अनेक मित्र , सखे , सोबती यांना जोडले जावे , आणि त्यातून निर्माण होणारे संघटन हे नैतिक कार्यासाठी क्रियावान करावे. आपले राष्ट्र , आपला धर्म , आपली संस्कृती यांच्या सन्मानार्थ प्रसंगी संघर्ष करावा लागला तरी , न डगमगता संघर्ष करावा. असा संघर्ष करीत असताना , केवळ भावना प्रधान न राहता. स्थिर बुद्धीने आणि स्थितप्रज्ञ वृत्तीने निर्णय घ्यावेत. आपले कार्य किती मोल

स्वा.सावरकर ज्येष्ठ नागरीक संघ धायरी येथे झाले व्याख्यान

Image
स्वा.सावरकर ज्येष्ठ नागरीक संघ धायरी येथे आज व्याख्यान झाले. विषय होता "  सावरकर समजून घेताना  " सर्व प्रथम पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेले सैनिक, दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस, सिने नाट्य अभिनेते रमेश भाटकर यांना श्रद्धांजली वाहून, कार्यक्रमाची सुरुवात झाली. साधारण पणे १२५ हून अधिक श्रोते होते.... यावेळेसचा विषय जरा वेगळा होता.... त्यामुळे केवळ सावरकर चरित्रातील घटना न सांगता गेल्या ३-४ वर्षांत घडलेल्या सामाजिक, राजकीय घटना, भारतावर झालेले दहशतवादी हल्ले, इ. विषयांचे संदर्भ देत, सावरकरांनी त्याबद्दल ८०-९० वर्षांपूर्वी मांडलेले विचार, त्यांच्या प्रत्येक कृती मागची पार्श्वभूमी उलगडत ६०-७० मिनिटे व्याख्यान चालले होते. सावरकर आत्मार्पण निमित्ताने हे व्याख्यान असल्याने, सावरकरांचे प्रायोपवेशन, अंतयात्रा आणि त्यांच्या पश्चात आणि अगदी आजही सावरकरांची होत असलेली अवहेलना यावरही भाष्य केले. सावरकरकरांचा अंतिम प्रवास सांगत असताना बऱ्याच श्रोत्यांना अश्रू अनावर झाले होते..... खरं तर मलाही शेवटी शेवटी गहिवरून आले होते..... व्याख्यान संपल्यावर काही क्षण शांतता होती आणि

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित निषेधसभा - वडगांव बु.

Image
आज १५ फेब्रुवारी २०१९..... वडगांव बु. येथे पाकिस्तानच्या निषेधसभेला संबोधित करताना, मी खालील विचार मांडले... पाकिस्तानचे कंबरडे मोडायचे असेल तर, त्याच्या बुडावर नाही तर पोटावर लाथ मारली पाहिजे, त्यासाठी सर्वप्रथम त्याला पैसा पुरवणाऱ्या चीनशी व्यवहार कमी करावे लागतील, त्यामुळे आपण सणासुदीला जर कोणतीही चिनी वस्तू घेत असू तर सर्वप्रथम हा विचार करावा की यातून चीनला मिळणारा पैसा, हा आपल्या सैनिकांच्या मृत्यूचे कारण तर बनणार नाही ना ? सिनेकलावंत, भाई, डॉन यांना आदर्श मानण्यापेक्षा या राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या राष्ट्रपुरुषांना आणि हुतात्मा सैनिकांनाच आदर्श मानले पाहिजे. आपापसात जात, वर्ण, वंश, प्रांत, भाषा यांवरून भांडण्यापेक्षा एकदिलाने राष्ट्रावरील संकट निवारण्याकरिता एकत्र आले पाहिजे. आपल्या आजूबाजूला काही संशयित घडामोडी घडत असतील, कोणी संशयित व्यक्ती फिरत असतील तर अश्यांच्या बाबतीत चौकशी करून, पोलीस यंत्रणेशी संपर्क केला पाहिजे. नागरिकाचे रूप घेऊन जर कोणी राष्ट्रद्रोह करत असेल तर त्या बद्दल सावधान राहणे आणि जागरूक राहणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रसुरक्षा

हे वागणं बरं नव्ह !!!

____________________________________________________________________ शब्दांकन :  श्रीपाद श्रीकांत रामदासी ७ फेब्रुवारी २०१९ रोजी , नवी दिल्ली येथे अल्पसंख्यांक परिषदेला , संबोधित करीत असताना राहुल गांधी यांनी सावरकरांना ' डरपोक ' असे संबोधले. त्यांच्या ३३-३४ मिनिटे चाललेल्या भाषणामध्ये २१-२२ व्या मिनिटाला त्यांनी अत्यंत जोश पूर्णपणे असे उदगार काढले की , " आपके सामने जो लोग खडे है , चाहे वो आर एस एस हो , चाहे वो बी जे पी हो , चाहे वो नरेंद्र मोदी हो , चाहे वो सावरकर हो , ये डरपोक लोग है " [ या भाषणाचे चलचित्र संदर्भासाठी राखून ठेवले आहे] मला हा प्रश्न पडलाय की स्वा.सावरकर हे या निवडणुकीत नेमक्या कोणत्या मतदार संघातून उभे आहेत ?  आणि तेही मृत्यूपश्चात ५३ वर्षांनी ??? याच भाषणात त्यांनी सावरकरांनी माफीनामा कसा लिहिला याचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवले. आपल्याच नव्हे तर आपल्या पित्याच्या जन्मापूर्वी २० वर्षे न घडलेल्या घटनेचे प्रात्यक्षिक करून दाखवण्याची कला , राहुल गांधींना कशी जमली हे एक कोडे आहे. दुसरे असे की राहुल गांधी ज्या सावरकरांना &#