अमर वीर हुतात्मा कोठारी बंधू
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgkX50G8w6tA-OVKAhwgfFuyBOZSTiLpPUrnqfLnfTTbZVcNZ7kQv-8ge1oY7vpOEuFdNaULjZoF_OSGuu3kBc0m2za9kRnZdx8Yik3sY61N5AswQKPifL1jZhL5bqy4f6V0NF4NTToVvw/w400-h300/Kothari_bandhu.jpg)
।। जय श्रीराम ।। हुतात्मा कोठारी बंधू तो काळ १९८९ चा होता, अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनाने अवघा हिंदुस्थान भारावून गेला होता. प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीला स्वतंत्र करून, भारत मातेच्या मस्तकी असणारा परकीय आक्रमकांचा, कलंक पुसून टाकण्यासाठी हिंदू समाज व्याकुळ झाला होता. सप्टें १९८९ ला ठीक-ठिकाणी श्रीराम ज्योत पूजन करण्यात येत होते, याच कार्यक्रमाच्या माध्यमातून कलकत्त्याचे दोन सख्खे बंधू रामकुमार आणि शरद कुमार कोठारी या २०-२२ वर्षाच्या तरुणांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. हे दोघे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आधीपासून करीत होते आणि त्यावेळी ते द्वितीय वर्ष शिक्षित होते. कोठारी बंधूनी १०० हुन अधिक ठिकाणी "श्री रामज्योत पूजन" कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ऑक्टो १९९० ला अयोध्येमध्ये जाऊन कारसेवा करायचे ठरले मा. अशोकजी सिंघल यांनी आवाहन केले " चलो अयोध्या ..... " (कारसेवा याचा अर्थ स्वतःच्या करकमलांनी (हातांनी) करायची सेवा). अशोकजींचे आवाहन समज