Posts

Showing posts from 2021

वासुदेव हा वासुदेवच.....

Image
  गेले दोन - तीन दिवस झाले, सांता क्लोज नको वासुदेव हवा , लाल टोपी नको वासुदेवाची टोपी घाला, महाराष्ट्राचा हरवलेला सांता क्लोज म्हणजेच वासुदेव ..... अश्या आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर वाचल्या.  खरं तर सांता क्लोज आणि वासुदेव यांची तुलना कधीच होऊ शकत नाही.  सांताच्या डोक्यावर टोपी आणि वासुदेवाच्या डोक्यावर पण टोपी म्हणून त्यांचा बादरायण संबंध जोडणे हे योग्य नाही.  सांता आणि भारतीय यांचा तसा सांस्कृतिक दृष्ट्या काहीही संबंध नाही, मुळात सांता क्लोज ही काही कुठली धार्मिक संकल्पना नाही. त्यात, कोणत्याही प्रकारचे ईश्वरीय अनुष्ठान नाही की; भक्तिमार्गाचे विवरण नाही.  युरोपियन चर्च मधून १८व्या शतकात केवळ ख्रिश्च्यानिटीचा प्रसार करण्यासाठी म्हणून, ख्रिसमसच्या निमित्ताने जगभर प्रसिद्धीस आणलेले पात्र म्हणजे हा सांता क्लॉस.   हां ! सांताचे; आपली खरी ओळख लपवून, लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे; ही बाब उल्लखनीय असली तरी त्यात ईश्वरीय अनुष्ठान कुठेच नाही.  त्याच्या अगदी उलट; ईश्वरीय अधिष्ठान असणारा जनमानसातील एक म्हणजेच वासुदेव.  प्रापंचिकाला देवाच...

टूट सकते हैं, मगर हम झुक नहीं सकते

Image
  Image_Source कवी मनाचा राजकारणपटू म्हणजेच भारताचे दिवंगत पंतप्रधान, " भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी ".  त्यांची संघ स्वयंसेवक, संवेदनशील नेता, अजोड वक्ता, उत्तम संसदपटू अशी अनेक रूपे ही सर्वांनाच ज्ञात आहेत.  परंतु आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त ( २५ डिसेंबर ) आम्ही त्यांच्यातील उत्स्फूर्त कवी या पैलूचा आधार घेत; त्यांच्या फारश्या प्रचलित नसलेल्या पण, आम्हांस प्रेरणादायी  वाटलेल्या त्यांच्या दोन कविता आम्ही, वाचकां समोर मांडत आहोत.   १) टूट सकते हैं, मगर हम झुक नहीं सकते: सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना, बऱ्याच प्रसंगातून जावे लागते, कधी मन उदास करणारे प्रसंग येतात तर कधी उद्वेग वाटावा असे प्रसंग येतात. जो सत्य आणि तत्वाच्या मार्गावर चालत असतो त्याला तर प्रसंगी सत्तेशी संघर्ष करावा लागतो.  असत्य आणि दमनशक्तीचा अंधकार तुमच्यातील उर्मीचा अंतिम  किरण सुद्धा झाकळण्याचा प्रयत्न करतो, तेंव्हा आपली तत्वे, ध्येय, धोरण यांच्या सन्मानासाठी, रक्षणासाठी, संकटांच्या छाताडावर पाय रोवून, तुम्हाला गिळंकृत करू पाहणाऱ्या अंधकाररुपी  अजग...

शाळेची शाळा !

Image
  राज्य सरकारने काढलेल्या फतव्या नुसार; १ ली ते ४ थी च्या शाळा पुन्हा सुरु करण्यात येत आहेत.  मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हे कदाचित योग्यही असेल; परंतु हे असे करणे किती संयुक्तिक आणि सहज आहे याचा देखील विचार झाला पाहिजे.  शाळा संचालक, पालक आणि विद्यार्थी यांच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक बाबींचा विचार या लेखाद्वारे मांडत आहोत.  टाळेबंदीच्या काळामध्ये, अनेक शाळांना निधी अभावी, हंगामी शिक्षक, सेवक यांना कमी करावे लागले आहे. आता शाळा सुरु झाल्याबरोबर त्यांची व्यवस्था करणे हे जिकरीचे ठरेल. टाळेबंदीमुळे शाळांना शुल्क कपात देखील करावी लागली आहे, त्यामुळे आवश्यक तेवढे शिक्षक, सेवक आणि अन्य कर्मचारी पुन्हा भरती करताना त्यांच्या वेतनाचा भार देखील शाळा प्रशासनावर पडणार आहे हे निश्चित आहे.  आधीच कमी झालेल्या उत्पन्नावर चालणाऱ्या शाळांपुढे नवीन भरती म्हणजे; दुष्काळात तेरावा महिना असेच ठरू शकते. सध्या कोविडचा नवीन प्रकार (व्हेरियंट) उद्भवल्याने राज्य सरकारने नवी नियमावली नुकतीच जाहीर केली आहे.  नियमभंग करणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक, दुकानदार, संस्था यांचेकडून रु. ५००...

स्वा. सावरकर : एक प्रतिभावंत.

Image
  नाशिक येथे संपन्न होत असणाऱ्या , ९४ व्या . अखिल भारतीय साहित्य संमेल्लनावरून बराच गोंधळ माजला आहे . त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप सुद्धा होताना दिसतो आहे . अशी ही संमेल्लने खरे  तर  सारस्वतांची मांदियाळी ठरली पाहिजेत परंतु दुर्दैवाने ती राजकीय आखाडा बनताना दिसत आहेत . स्वा . सावरकरां सारख्या साहित्यिकाच्या जन्मभूमी मध्ये हे संमेल्लन आयोजित होत असताना , संमेलनाचे गीत , प्रवेशद्वार किंवा व्यासपीठ या पैकी कशातही सावरकरांना स्थान नसणे ही बाब खटकते आहे . काही सावरकर प्रेमी यासाठी निषेध , विनंती   करून अशी मागणी करताना दिसत आहेत.   पण इथे प्रश्न असा पडतो की ; ही वेळच का यावी ?  स्वा . सावरकरांच्या अन्य बाबींप्रमाणे त्यांचे साहित्य देखील काहींना पोटशूळ उठवते आहे का ? , स्वा . सावरकरांचे साहित्य विश्वातील योगदान , आयोजक विसरले तर नाहीत ना ? असे जर असेल , तर स्वा . सावरकरकरांची प्रतिभा कशी होती ? त्यांनी कोणकोणत्या साहित्य प्रकारात संपदा निर्माण केली होती ? य...